Monday, November 19, 2012

बाळासाहेब





“माझ्या तमाम हिंदु बंधू, भगिनी आणि मातांनो !”  या वाक्यानिशी लाखो टाळ्यांच्या गजरात आपल्या डरकाळीने अवघा हिंदूस्थान हादरवून टाकणारा ‘ढाण्या वाघ’ आज अगोदरच वाघांची संख्या कमी होत असलेल्या या हिंदूस्थानातून आपल्या परतीच्या प्रवासाला निघून गेला.
श्रीधर अर्थात बाळ केशब ठाकरे, प्रबोधनकारकांच्या झूंजार विचारांपासून प्रेरणा घेउन, जगविख्यात व्यंगचित्रकार म्हणून आपली ख्यात्यी पसरविलेल्या या कलाकाराने तब्बल पाच दशके या महाराष्ट्रावर आधिराज्य गाजविले.तमाम भारतवासियांच्या गळ्यातला ताईत बनलेली ही व्यक्ती आपल्या धारेधार कुंचल्यातून कपटी राजकारण्यांवर फ़टकारे मारीत एक विराट संघटना बांधून त्याचा पक्ष उभा करतो त्यावरच न थांबता तो सत्तेत आणून सत्ता देखील गाजवितो. हो पण स्वत: मात्र कधीही खूर्चीच्या मोहात न अडकता ‘रिमोट’ बनून सर्व सत्तेवर आपला अंकूश ठेवतो. आपल्या रोखठोक, फ़क्त आणि फ़क्त सत्य-वाणीने खास ठाकरे स्टाईलने संपूर्ण हिंदूस्थान ढवळून काढणा-या त्या हिंदूरृद्यसंम्राटास आमचा मानाचा मुजरा.
बाळासाहेब, तूम्ही आपल्या परखड विचारांचे मराठी मनावर कोरलेले संस्कार आम्ही कदापी विसरू शकत नाही. पण आपल्या धगधगत्या शब्दरूपी ज्वाळांनी आता यापुढे हा आसमंत प्रकाषमान होणार नाही याची मनाला बोचरी लागते.
गर्व से कहो हम हिंदू है ।
होय ! फ़क्त हिंदूच.
प्रांताप्रांतातील लोक हिंदू म्हणून जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत तरणोपाय नाही.
माझ्या शिवसैनिकांनीच बाबरी पाडली आणि मला त्याचा सार्थ अभिमानच आहे.
पाकिस्तानने जर हायड्रोजन बॉंब तयार केले तर आम्ही काय जपमाळ धरून मणी ओढत बसायचे काय ?  ….   
छत्रपती शिवरायांना आपले दैवत मानून शिवतिर्थावरून गेली सत्तेचाळीस वर्ष अश्या धगधगत्या असंख्य,अगणित गोळ्यांचा वर्षाव करणारी ती तोफ़ काल अखेर त्याच शिवतिर्थावर अश्रूंच्या असंख्य पाटांमधे भिजून कायमची थंड झाली.आज त्यांचा लाखोंच्या संख्येतला तो कडवा,राकट,निर्भिड शिवसैनीक म्हणत असणार, “साहेब,आम्हाला क्षमा करा. तूमच्यासाठी नडलो  तूमच्यासाठीच भिडलो पण… पण खर सांगतो साहेब आज मात्र त्या ‘यमापूढे’ अडलो !”  
 आपल्या परखड विचारांनी आणि धारधार वाणीने अलोट गर्दीचे उच्चांक मांडणा-या या वाघाला छोट काम कधी मान्यच नव्हत ‘चारचौघांसारखा मृत्यू, ही कल्पनाही मला असह्य वाटते.मला मृत्यू असा हवा की तो अविस्मरणिय ठरावा.’ हे स्वप्न देखील त्यांनी आज पूर्ण केले. हिंदूस्थानातून आलेला त्या जनसागराने त्यांचेच अलोट गर्दीचे सर्व उच्चांक मोडून काढले.न भूतो न भविष्यंती महायात्रेने’आपण कोण होतो,काय आहोत आणि काय असणार’ हेच आज देखील पून्हा सिद्ध केले.कधिही न थांबणा-या मुंबापुरीला आज तूम्ही पूर्णपणे स्तब्ध केलेत.
मा. बाळासाहेब,आमच्यासारखे तमाम हिंदुस्थानातील सर्व चाहते आपणास कदापी विसरणार नाहीतच पण फ़क्त एक वचन द्या, सूवर्ण झळाळीने उजळून भगव्या झालेल्या त्या तूमच्या स्वर्गातल्या जागेवर बसून तूम्ही आणि स्वत: शिवराय या हिंदूस्थानावर आपली करडी नजर सदैव ठेवा आणि आपला आवाज या पृथ्वीतलावर आम्हाला कायम ऐकू येवूद्यात कारण…
गर्जना तूमची होताच, भरते देशद्रोह्याला कापरे,हिंदूस्थानात फ़क्त आणि फ़क्त एकच साहेब…..  ॥ बाळ केशव ठाकरे ॥

आपल्याबद्दल बोलायची लिहायची आमची लायकी नाही, पण तरिही आपल्या या छोट्याश्या चाहत्याकडून आपणास भावपूर्ण श्रद्धांजली. जय महाराष्ट्र…. निलेश गो. वाळिंबे.